Amrita Rao Life After Bollywood Return In Jolly LLB 3 : बॉलीवूड अभिनेत्री अमृता राव ही आज (7 जून) आपला वाढदिवस साजरा करत आहे. एकेकाळी ‘इश्क विश्क’, ‘मैं हूं ना’, ‘विवाह’ यांसारख्या हिट चित्रपटांमुळे घराघरात पोहोचलेल तिचं नाव आज चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. परंतु, ती सध्या काय करतेय? आणि पुन्हा एका मोठ्या प्रोजेक्टसह कमबॅक करणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात.

‘अब के बरस’ पासून सुरुवात
2002 मध्ये ‘अब के बरस’ या चित्रपटातून अमृता रावने बॉलीवूडमध्ये पदार्पण केल आणि त्यानंतर ‘इश्क विश्क’, ‘मस्ती’, ‘मैं हूं ना’, ‘विवाह’, ‘जॉली एलएलबी’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमुळे तीन प्रेक्षकांच्या मनात घर केल. विशेषतः ‘विवाह’ मधील तिची सोज्वळ भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे.

मॉडेलिंगसाठी सोडल शिक्षण अर्धवट
मुंबईतील कनोजा गर्ल्स स्कूल आणि नंतर सोफिया कॉलेजमध्ये मानसशास्त्राचं शिक्षण घेत असताना अमृताने मॉडेलिंगमध्ये प्रवेश केला त्यासाठी तिला शिक्षण अर्धवट सोडाव लागल. याच निर्णयामुळे तिला चित्रपटसृष्टीची वाट खुली झाली.

2019 नंतर पडद्यावरून गायब
2019 साली ‘ठाकरे’ या चित्रपटात शेवटच झळकलेली अमृता यानंतर कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. याआधी 2016 मध्ये तिने आपल्या बॉयफ्रेंड आरजे अनमोल याच्यासोबत विवाह केला. 2020 मध्ये त्या दोघांना पुत्ररत्न झाले.

अमृता राव आता काय करते?
चित्रपटांपासून दूर गेलेल्या अमृताने पती अनमोलसोबत ‘Couple of Things’ नावाच यूट्यूब चॅनल सुरू केल आहे. दोघांनी मिळून एक पुस्तकही लिहिल आहे. या चॅनलवर दोघ सेलिब्रिटी मुलाखती घेतात आणि त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील अनुभव शेअर करतात.

‘जॉली एलएलबी 3’ मध्ये पुन्हा झळकणार
बऱ्याच वर्षांची विश्रांती घेतल्यानंतर, अमृता राव लवकरच ‘जॉली एलएलबी 3’ या बहुप्रतिक्षित चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
हेही वाचा : हाउसफुल 5 ने रिलीजआधीच कमावला इतक्या कोटींचा गल्ला, अक्षय कुमारचा ब्लॉकबस्टर धमाका.